Breaking
17 Oct 2024, Thu

**महात्मा ज्योतीबा फुले (१८२७-१८९०)**

**महात्मा ज्योतीबा फुले (१८२७-१८९०)** 

👉महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म ११ एप्रील १८२७ रोजी पुण्यामध्ये झाला.
👉११ एप्रील – राष्ट्रीय शिक्षक हक्क दिन
👉 त्यांचे मुळगाव सातारा जिल्हयातील “कटगुण” हे होते. 
👉 महात्मा फुले यांचे मुळ नाव ज्योतीबा गोविंदराव फुले हे होते.
👉 त्यांच्या आईचे नाव “चिमणाबाई” होते तर आजोबांचे नाव “शेरीबा” हे होते. 
👉ज्योतीबा हे ०१ वर्षाचे असताना त्यांच्या आईचा मृत्यु झाला नंतर ज्योतीबांचा संभाळ त्यांची आत्या “सगुनाबाई” यांनी केला. 
👉 ज्योतीबांचे मुळ आडनाव “गोहे” हे होते. ज्योतीबांच्या आजोबांचा फुलांचा व्यवसाय होता. कालांतराने त्यांचे फुल व्यवसायाहुन फुले असे झाले. ज्योतीबा हे जातीने क्षत्रीय माळी समाजाचे होते. सार्वजनिक काका व रा. गो. भंडारकर हे ज्योतीबा फुलेंचे वर्ग मित्र होते. १८३४ ते १८३८ मध्ये ज्योतीबांनी प्राथमिक शिक्षण पंतोजींच्या मराठी शाळेत घेतले. ज्योतीबा फुल्यांच्या वडीलांच्या कारकुनामुळे ज्योतीबांस शिक्षणापासुन वंचीत रहावे लागले.  १८४० मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह सातारा जिल्हयातील धनकवडीच्या खंडोजी सिंधुजी नेवसे (झगडे पाटील) यांची कन्या “सावित्रीबाई” यांच्याशी झाला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ०३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयातील “नायगाव” येथे झाला. ०३ जानेवारी हा दिवस राज्यामध्ये “राज्य स्त्री मुक्ती दिन” म्हणुन साजरा केला जातो. महत्वाचे :- ०३ जानेवारी २००४ रोजी महाराष्ट्र सरकारने सावीत्रीबाई फुले यांचे नायगाव जि. सातारा येथील घर “राष्ट्रीय स्मारक” म्हणुन घोषीत केले आहे. सावित्रीबाई फुले या देशातील पहील्या शिक्षीका व पहील्या मुख्याध्यापिका होत.  महात्मा फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. सावित्रीवाई यांचे शिक्षण “नॉर्मल स्कुल” या शाळेत झाले. त्यांचे शिक्षक “यशवंतराव परांजपे” हे होते. सावित्रीबाई फुले यांनी १८५४ मध्ये “काव्यफुले” तर १८९२ मध्ये “बावनकशी” व “सुबोध रत्नाकर” हे काव्यसंग्रह लिहीले. ज्योतीबांची चिंतन शिलता व बौद्धीक कौशल्य पाहुन शेजारी राहणारे ऊर्द शिक्षक गफार बेग मुन्सी व धर्मोपदेशक लिजीट साहेब यांच्या प्रयत्नाने ज्योतींबाना खाजगी स्कॉटीश मिशनीरीच्या शाळेत प्रवेश घेतला. संस्कृत, व्याकरण, ज्योतीष, विज्ञान, धर्मशास्त्र इ. विषयांचा अभ्यास ज्योतीबांनी या शाळेत केला. या शाळेतच ज्योतीबांची मैत्री सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राम्हण मुलाशी झाली.  फुले बंडखोर वृत्तीचे होते. त्यांना राजकीय व सामाजिक गुलामगिरी बद्दल चिड होती. इंग्रजांचे राज्य उलथवून टाकण्याच्या उद्देशाने १८४७ मध्ये ज्योतीबांनी लहुजी उस्ताद मांग-साळवे या पैहलवानाकडुन नेमबाजी व दांडपट्टयाचे प्रशिक्षण घेतले होते. पंरतु लवकर आपल्या विचारातील फोलपणा त्यांना दिसुन आला.   फुले यांच्यावर संस्कृत मधील वज्रसुची व कबीरांच्या “विप्रमती” या ग्रंथातील काही भागांचा प्रभाव होता. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज व माटींग ल्युथर किंग यांच्या पासुन अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी घेतली.   १८४७ मध्ये “थॉमस पेन” यांच्या “राईट्स ऑफ मॅन” या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. थॉमस पेन यांची इतर पुस्तके – जस्टीस अॅन्ड ह्युम्यानिटी, कॉमनसेन्स, एज ऑफ रिजन व राईट्स ऑफ मॅन.

 १८४८ मध्ये ब्राम्हण मित्राच्या वरातीमध्ये एका माळ्याचा मुलगा म्हणुन ब्राम्हणांनी त्यांचा अपमान केला
होता. हा प्रसंग त्यांच्या जिवनास कलाटणी देणारा ठरला. 

 ०३ ऑगस्ट १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठ मधील भिड्यांच्या वाड्यात ज्योतीबांनी देशातील
पहीली मुलींची शाळा सुरु केली. स्वतंत्रपणे मुलींची शाळा सुरु करणारे ज्योतीबा हे पहीले समाजसुधारक होते. मुलींच्या शाळेच्या स्थापनेच्या प्रेरणा अहमदनगरच्या स्कॉटीश शाळेच्या शिक्षीका “मिस फरार” यांच्या कडुन ज्योतीबांनी घेतली. 

 ०३ जुलै १८५१ रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठ मध्ये आण्णासाहेब चिपळुणकर यांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरु केली. १७ सप्टेंबर १८५१ रोजी पुण्यातील रास्ता पेठ येथे मुलींची तिसरी शाळा ज्योतीबांनी सुरु केली. १५ मार्च १८५२ रोजी वेताळ पेठ मध्ये मुलींची चौथी शाळा
ज्योतीबांनी सुरु केली. 

महत्वाचे :- १९ मे १८५२ रोजी पुण्यातील “वेताळ पेठ” येथे ज्योतीबांनी अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी
पहीली शाळा सुरु केली. 

 १७ सप्टेंबर १८५२ रोजी ज्योतीबा फुले यांनी पुण्यात लायब्ररीची स्थापना केली. 

 १६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुणे महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य थॉमस कॅन्डी यांनी ब्रिटीश सरकारचे वतीने पुण्यातील विश्रामबाग वाड्यात ज्योतीबांचा विशेष सत्कार केला. 

१० सप्टेंबर १८५३ रोजी “महार, मांग, चांबार इ. लोकांस विद्या शिकविणारी मंडळी” या नावाची संस्था
ज्योतीबांनी सुरु केली. लोकांना शिकविण्याकरीता शिक्षक उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सदरची संस्था चालु
करण्यात आली होती. या संस्थेमार्फत १८५८ पर्यंत ०३ शाळा स्थापन करण्यात आल्या. 

 ब्रिटीशांनी फुलेंच्या स्त्री शिक्षणासाठी “दक्षिणा प्राईज फंड” च्या साह्याने दरमहा २५ रु प्रमाणे मदत
केली. 

 १८५४ मध्ये ज्योतीबांनी स्कॉटीश मिशनरी शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली. 

महत्वाचे :- १८५५ मध्ये भारतातील पहीली “पौढांसाठीची रात्र शाळा” ज्योतीबांनी पुण्यात सुरु केली 

 १८५५ मध्ये ज्योतीबांनी “तृतीय रत्न” हे नाटक लिहीले. ब्राम्हण लोक शुद्रांची कशी फसवणुक करतात हे  त्यांनी सप्रमाण या नाटकातुन दाखवुन दिले. 

 ०८ मार्च १८६० रोजी पुण्यात ज्योतीबांनी पहीला पुर्नविवाह घडवुन आणला. 

 १८६३ मध्ये ज्योतीबा फुलेंनी स्वतःच्या घरीच भारतातील पहीले “बालहत्या प्रतिबंधक गृह” स्थापन केले व नंतर पंढरपुर येथेही ज्योतीबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. 

 निपुत्रीक असताना देखील दुसरे लग्न न करता फुलेंनी बाल हत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई ब्राम्हण
विद्धवेचा “यशवंत” हा मुलगा दत्तक घेतला व त्याला डॉक्टर केले. 

 १८६४ मध्ये पुण्यातील गोखल्यांच्या बागेत “शेरवी” जातीतला “पहीला विधवा पुर्नविवाह” ज्योतीबांनी  घडवुन आणला. 

 १८६५ मध्ये देशातील विधवांच्या केस रोपनाच्या प्रथेला विरोध करण्याकरीता ज्योतीबांनी पुण्यातील
“तळेगाव ढमढेरे” व “ओतुर” येथे “न्हावीकांचा संप” घडवुन आणला. 

 १८६७ मध्ये रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार करण्याचे महत्वपुर्ण काम ज्योतीबांनी केले. 

 ज्योतीबांच्या कार्यामुळे सनातनी लोकांनी त्यांना मारण्याकरीता शेंडे व कुंभार या मारेकऱ्यांना पाठविले होते
पंरतु तेच मारेकरी नंतर फुल्यांचे अनुयायी बनले. 

 १८६८ मध्ये अस्पृश्यांसाठी ज्योतीबांनी त्यांचे घरातील पाण्याचा हौद खूला केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *