स्थापन – 17 ऑगस्ट 2017
लोकार्पण 1 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या हस्ते
30 जानेवारी 2017 रोजी रायपूर आणि रांची या दोन शाखांचे प्रायोगिक तत्वावर उद्घाटन
1) या बँकेला फक्त मुदती स्वीकारता येतील. कर्जे आणि के्रडीट कार्ड वितरण करता येणार नाही.
2) व्यवहार – लहान स्वरुपात व जोखम विरहीत
3) या बँका प्रत्येक खातेधारकाडून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम स्वीकारु शकतात.
4) या बँकत सामान्य, व्यावसायिक तसेच विविध संस्थाही खाते उघडू शकतात.
5) ही बँक 100 टक्के सरकारी आणि पोस्ट खात्याच्या अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे.
6) ही बँक एअरटेल व पेटीएम बँकेनंतर पेमेंट बँकेचा परवाना मिळालेली तिसर्या क्रमांची बँक आहे.
7) या बँकध्ये बचत व चालू खात्यांची सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे
8) या बँकमध्ये ठेवीची किमान मर्यादा नाही. परंतू जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंत ठेव शकतात. त्यापुढील रक्कम थेट टपाल कार्यालय बचत खात्यात जाम होईल.
9) या बँकेतील बचत खात्यावर 4 टक्के व्याजदर दिला जातो.
10) या बँकेतील खातेधारक सुकन्या समृद्धी, आवर्ती योजना, स्पीड पोस्ट यासारख्या योजनांचाही लाभ घेता येईल.
2) दुय्यम कार्ये
अ) प्रातिनिधिक कार्ये
खातेदारांची कार्ये त्यांचे प्रतिनिधी म्हणून बँका करतात, त्याला प्रातिनिधिक कार्ये असे म्हणतात. यामध्ये ग्राहकांच्या वतीने धनादेश, व्याज लाभांश, बिले गोळा करणे, बँकेचे हप्ते, भाडे, कर देणे, रोख्यांची खरेदी-विक्री करणे त्याचप्रमाणे खातेदारांच्या ठेवीचे विश्वस्त म्हणून रक्षण करणे, मृत्यूपत्रानुसार खातेदाराच्या मृत्यूनंतर व्यवस्थापन करणे कशी प्रातिनिधिक कार्ये बँकेकडून केली जातात.
ब) सामान्य कार्ये
यामध्ये ग्राहकांना लॉकर्स (सुरक्षाकप्पा) ची सुविधा दिली जाते. डिमांड ड्राफ्टद्वारे पैशांचे हस्तांतरण करणे, परकीय चलनाचा व्यवहार करणे, एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यासारख्या सुविधा पुरविणे, त्याचप्रमाणे वेळोवेळी सांख्यिकीय माहिती संकलित करुन ती प्रकाशित करणे ही सामान्य कार्ये व्यापारी बँकांना करावी लागतात.